मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

हरीण

हरीण

बेधुंद धावते  
घेऊन पायामध्ये प्राण।।
काट्याकुट्यातून वाटं 
मागे भुकेलेले श्वान।।

थकल्या पावलांनी कसे 
तुडवती माळरान।।
 वेढले चहूबाजूंनी 
आता पायात नव्हते त्राण।।

थकलेल्या जीवाला मग
अपुरे पडले रान।।
 घेतला शेवटचा श्वास
 टाकली त्याने मान ।।

महागाईच्या दुनियेमध्ये
आज स्वस्त झाले प्राण ।।
पाहूनीया  हे सारे 
न हेलावले मन ।।

कारण हेच आहे जग 
हेच आहे जीवन।।
sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा