Wednesday, April 1, 2020

२१ दिवस

२१ दिवस
२१ दिवस घरात बसल म्हणुन काही
आयुष्यच जळत नाही
 समजत नाही अशिक्षितांना जे कळतं
 ते शिक्षितांना का कळत नाही!!

 बाजारात भाजीपाल्याला रांगा लावण्यापेक्षा
 महिनाभर डाळभात खाल्ला  म्हणून कोणी मरणार  नाही
 कारण  आज घरात  नाही  बसला तर
परत भाजीपाला  खायला कोणी उरणार नाही!!

 नाही गेलं कामावर तर
असं काय होणार आहे
आज घरी बसला तरच
 पुढच्या महिन्यात कामावर जाणार आहे!!

 मला काही होत नाही म्हणून
 फेरफटका मारणारे पण खूप भेटतात
 तंबाखू आणायला जाणाऱ्यांनाही
 पोलीस रोज रेटतात !!

आजच थोडं घरी थांबा
 परत रोजच मिरवायच आहे
घरामध्ये बसून आज
करोनाला हरवायचे आहे!!

--sandip jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com

प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो कोणाला तो खिडकीतुन बघण्यासाठी आसतो तर कोणाचा पाऊस हा जगण्यासाठी आसतो कोणाला तो तळहातावर मोत्यांसारखा दि...