बुधवार, १ एप्रिल, २०२०

२१ दिवस

२१ दिवस
२१ दिवस घरात बसल म्हणुन काही
आयुष्यच जळत नाही
 समजत नाही अशिक्षितांना जे कळतं
 ते शिक्षितांना का कळत नाही!!

 बाजारात भाजीपाल्याला रांगा लावण्यापेक्षा
 महिनाभर डाळभात खाल्ला  म्हणून कोणी मरणार  नाही
 कारण  आज घरात  नाही  बसला तर
परत भाजीपाला  खायला कोणी उरणार नाही!!

 नाही गेलं कामावर तर
असं काय होणार आहे
आज घरी बसला तरच
 पुढच्या महिन्यात कामावर जाणार आहे!!

 मला काही होत नाही म्हणून
 फेरफटका मारणारे पण खूप भेटतात
 तंबाखू आणायला जाणाऱ्यांनाही
 पोलीस रोज रेटतात !!

आजच थोडं घरी थांबा
 परत रोजच मिरवायच आहे
घरामध्ये बसून आज
करोनाला हरवायचे आहे!!

--sandip jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com