वर वर जरी वाटत आसले, आता तुला मि टाळत आहे
आठवण आजही तेवढीच येते, पण दिला शब्द पाळत आहे
वाटते करावा फोन तुला, आन बोलत राहावे तासन तास
तसे जरी करत नसलो, तुझ्याच आठवणी चाळत आहे
हारवुन जात होतो कधी, आकाशातील ताऱ्यांमध्ये
तु सोडून गेल्यापासून बघ चंद्र ही कसा छळत आहे
पहिल्या सारख्या कविताही हल्ली हल्ली बनत नाही
गोळा केले शब्द सारे आन ह्रदय त्यावर जाळत आहे
वर वर जरी वाटत आसले, आता तुला मि टाळत आहे
आठवण आजही तेवढीच येते, पण दिला शब्द पाळत आहे
sandip s. jagtap
my blog-
No comments:
Post a Comment